रत्नागिरी जिल्हा
रत्नागिरी जिल्हा
रत्नागिरी जिल्हा | |
महाराष्ट्रच्या नकाशावरील स्थान
| |
देश
| |
मुख्यालय
| |
तालुके
| |
क्षेत्रफळ
|
८,२०८ चौरस किमी (३,१६९ चौ. मैल)
|
१६,९६,७७७ (२००१)
| |
२०७ प्रति चौरस किमी (५४० /चौ. मैल)
| |
शहरी लोकसंख्या
|
११.३३%
|
६५.१३%
| |
प्रमुख शहरे
| |
रत्नागिरी जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३6 जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा आहे. रत्नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याची शहरी लोकसंख्या ११.३३% इतकी आहे.
हल्लीचा रत्नागिरी जिल्हा हा ब्रिटिश काळात आणि नंतरही उत्तर रत्नागिरी जिल्हा म्हणून ओळखला जात होता. हल्लीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला दक्षिण रत्नागिरी जिल्हा म्हणत. या जिल्ह्यात सावंतवाडी या संस्थानाचाही समावेश होता. सन १९८१ साली या जिल्ह्यांची नावे बदलली.
प्रसिद्ध व्यक्ती
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महर्षी धोंडो केशव कर्वे, महामहोपाध्याय पां वा. काणे, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
भूगोल
रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा
- पश्चिमेस अरबी समुद्र
- दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा
- उत्तरेस रायगड जिल्हा
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या
काजळी, केव, गड, बोर, मुचकुंदी, वाशिष्टी, शास्त्री, सावित्री
तालुके
रत्नागिरी जिल्ह्यात खालील तालुके समाविष्ट आहेत:
दळणवळण
रत्नागिरी ते कोल्हापूर (राष्ट्रीय महामार्ग २०४)
प्रेक्षणीय स्थळे
रत्नागिरी जिह्यातील गड-किल्ले
१. आंबोळगड
२. गोपाळगड
३. गोविंदगड
४. जंगली जयगड
५. जयगड
६. पालगड
७. पूर्णगड
८. प्रचितगड
९. भवानीगड
१०. महिपतगड
११. महीमंडणगड
१२. यशवंतगड
१३. रत्नदुर्ग
१४. रसाळगड
१५. विजयगड
१६. सुवर्णदुर्ग
शेती
रत्नागिरी जिल्हा हापूस आंब्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच काजू, नारळ, फणस, आमसूल(रातांबा) इत्यादींची लागवड येथे केली जाते. तांदळाची शेती येथे प्रामुख्याने केली जाते.
राजकीय संरचना
लोकसभा मतदारसंघ (१) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग.
संदर्भ
रत्नागिरी जिल्ह्यातील तालुके
nice collection
ReplyDelete